औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं हे विसरु नका – संजय राऊत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं हे विसरु नका – संजय राऊत

मुंबई, दि. 13 मे - महाराष्ट्राला खिजवण्यासाठी ओवैसी बंधू औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होत आहेत. महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा डाव असून, एक दिवस त्याच कबरीत ओवैसींना जावे लागेल अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी एमआयएम नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेलं आव्हान असून, आपण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं हे विसरु नका असा इशारा दिला आहे.

एमआयएम नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी औरंगाबादेत आले होते. त्यानंतर त्यांनी खूलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावरुन त्यांच्यावर मोठी टीका केली जात आहे.

राऊत म्हणाले, औरंगजेब साधु-संत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्याने लढाई लढली. औरंगजेबाला मराठ्यांनी मातीत गाडलं, तुम्हालाही एक दिवस मातीतच जावे लागेल असे म्हणत तिथे नतमस्तक होण्याची गरज नसतानाही औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होऊन ते महाराष्ट्रातील वातावरण बिघडवत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

औरंगजेब काय महान संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केलं, मंदिरं उद्ध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मराठा योद्ध्यांनी त्याच्यासोबत लढाई लढली आहे. पण आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणं हे आव्हान दिल्यासारखं आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारतो. औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करु इच्छित आहेत त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

संजय राऊत यांच्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनीही तोफ डागली आहे. या वेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. “मी आव्हान करतो…पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा…याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.

ओवेसीला माहित आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.