गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न, राजगडसह तोरणा गडाच्या विकास आराखड्यास मान्यता : मुनगंटीवार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न, राजगडसह तोरणा गडाच्या विकास आराखड्यास मान्यता : मुनगंटीवार

     मुंबई , (प्रबोधन न्यूज )  -  राज्यातील गडकिल्ल्यांना  युनेस्कोचा  जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी दिली.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि प्राचीन कातळशिल्पे या तीन प्रकारातील संवर्धन प्रस्ताव युनेस्कोला देण्यात आले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. सह्याद्री अतिथीगृहात सांस्कृतिक कार्यमंत्री सधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले जतन, संवर्धन व व्यवस्थापनासंबंधी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि प्राचीन कातळशिल्पे या तीन प्रकारातील संवर्धन प्रस्ताव युनेस्कोला देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या युद्ध तंत्रासंदर्भात या गडकिल्ल्यांची वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यात येत आहेत. जागतिक इतिहासाच्या पटावर या किल्ल्यांचे ऐतिहासिक व पुरातत्वीय महत्व युनेस्कोला पटवून देण्याचे काम राज्य पुरातत्व विभाग करत असल्याची माहिती पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी दिली.

राजगड, तोरणा गडकिल्ल्यांच्या विकास आराखड्यास मान्यता

किल्ल्यांच्या संरक्षणाबाबत पुरंदरचे आमदार संग्राम थोपटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे मागणी केली होती. त्या अनुषंगाने देखील राजगड, तोरणा गडकिल्ल्यांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्या मागणीनुसार किल्ले रायरेश्वर, रोहिडेश्वर, सोनवडी आणि दौलत मंगल हे गडकिल्ले देखिल किल्ले संवर्धन योजनेत समाविष्ट करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी प्रशासनास दिले आहेत. तसेच राज्यातील अन्य 59 गडकिल्ल्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.