ठाकरे आणि शिंदे गटाच्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ठाकरे आणि शिंदे गटाच्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी

नवी दिल्ली (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय ब्रेकअपच्या मुद्द्यासंदर्भातील सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत उद्धव ठाकरेंची मागणी सर्वोच्च न्यायालयात मान्य होणार का? याकडे राजकीय वर्तुळासह सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.

आधी दोन न्यायमूर्तींचे व्हॅकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर कोर्टानं विनंती मान्य केली तर सात न्यायमूर्तींचं बेंच. सत्तासंघर्षाचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं 20 जून 2022 च्या दरम्यान. त्यानंतर आता आठ महिने झाले तरी या केसमध्ये अद्याप एकही निर्णय, आदेश झालेला नाही, केवळ बेंच बदलत आलेत. त्यामुळे आता आज काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

20 जून 2022 रोजी रात्रीच एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. त्यांच्याबरोबर 39 आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी, राज्य सरकारच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यासह इतर मुद्द्याबद्दल शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी आव्हान दिलेलं आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर या सर्व याचिकांवर सुनावणी सुरू असून, आज घटनापीठ काय निर्णय देणार, हे महत्त्वाचं असणार आहे.