बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान ‘वीर चक्र’ पुरस्काराने सन्मानित
पुलवामात 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये शहीद झालेल्या 40 जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारताने 26-27 फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानात एअर स्ट्राईक केलं होतं. बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक दरम्यान अनेक दहशतवादी मारले गेले होते. भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्टाईकला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडूनही भारतीय बॉर्डरवर आपलं विमान पाठवले होते. मात्र, अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं. यावेळी अभिनंदन यांच्या विमानालाही अपघात झाला आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्यानं अभिनंदन यांना ताब्यात घेतलं. होतं. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरुन पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण केला. त्यामुळे तीन दिवस पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात राहिलेल्या अभिनंदन यांना भारताकडे सोपवणं पाकिस्तानला भाग पडलं होतं.