आज शरद पवार यांच्या हस्ते भोसरीतील शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आज शरद पवार यांच्या हस्ते भोसरीतील शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी

पिंपरी-चिंचवड, दि. 11 मे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या भाषणात फक्त शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करीत नाहीत, त्यांना वंदन करीत नाहीत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच केली होती. त्याला सणसणीत प्रत्युत्तर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आज (बुधवारी) देणार आहे.

शरद पवारांच्या हस्ते भोसरी येथील शिवसृष्टीतील शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी होणार आहे. एवढेच नाही, तर राज यांच्यामार्फत सध्या भोंगा आणि हनुमान चालिसाव्दारे झालेल्या धुव्रीकरणाच्या राजकारणाला सुद्धा राष्ट्रवादी कार्यक्रम करून  चपराक देणार आहे. बुधवारी आपल्या सर्वोच्च नेत्याच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रीय एकात्मता स्नेहमेळावा तथा जश्ने ईद-ए-मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला हिंदू, मुस्लिमच नाही, तर ख्रिश्चन, शीख अशा सर्वच धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात आले आहे.

शिरूरचे पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहरातील आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे आणि सर्व आजी, माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जश्न-ए ईद मिलनच्या आयोजनामागील हेतू बद्दल शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, राजकीय अस्तित्व संपत आलेल्या पक्षाला पुढे करून केंद्र सरकार हे जातीय तेढ निर्माण करीत असल्याची टीका त्यांनी भाजपसह मनसेवरही केली. प्रक्षोक्षक भाषणे करून हिंदू-मुस्लिमांत दरी निर्माण  करण्याचे काम सध्या सुरु असून ती मिटविण्याचा एक प्रयत्न म्हणून हा सोहळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.