सत्यजीत तांबेंचा विजय आमच्यामुळेच – मुख्यमंत्री

सत्यजीत तांबेंचा विजय आमच्यामुळेच – मुख्यमंत्री

वर्धा (प्रबोधन न्यूज) – नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय हा बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यामुळेच झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथे बोलताना केला. वास्तविक सत्यजीत तांबे यांना सर्वच पक्षांचा पाठिंबा होता. तसेच सत्यजित यांनी याबाबत कोणतेही राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी वर्ध्यात आले होते. तिथेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्यजीत तांबेंबाबत भाष्य केलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ही एक विशिष्ट प्रकारची निवडणूक होती. महाविकास आघाडीकडे तीन जागा होत्या आणि भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीकडे दोन जागा होत्या. त्या दोन जागा आपल्याला माहिती आहे की, कोकणातील जागा आपण जिंकली. नाशिकमधील देखील जागा भाजप आणि शिवसेनेच्या मदतीने त्या ठिकाणी जिंकलेली आहे. पण ज्या काही जागा यायला हव्या होत्या. त्या आल्या नाहीत याची नक्कीच कारणमीमांसा केली जाईल. त्यावर देखील विचार करून सुधारणा केली जाईल.' असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

निवडणुकीआधी सत्यजीत तांबेंबाबत झालेल्या एकूण राजकारणातनंतर ते आता भाजपमध्ये जाणार की, पुन्हा काँग्रेस त्यांना सामावून घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.