राज ठाकरेंना पोस्टमनची उपमा देत सुषमा अंधारेंची खोचक टीका

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज ठाकरेंना पोस्टमनची उपमा देत सुषमा अंधारेंची खोचक टीका

चित्रा वाघ, फडणवीस, मोदी यांच्यावरही अंधारेंनी तोफ डागली

पुणे (प्रबोधन न्यूज) - हल्ली खूप पोस्टमन झाले आहेत. पोस्टमन असणारे लोक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरोधात एक पत्र महाशक्तीला लिहावे. कोश्यारींना परत बोलवा म्हणून ते पत्रं का लिहीत नाही? म्हणजे पोस्टमनचे पत्र लिहिणंही स्क्रिप्टेड आहे काय? असा सवाल उपस्थित करत अंधारे यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. सुषमा अंधारे या पुण्यात बोलत होत्या.

एक बाई चंद्रकांत दादांची ज्योतिबा फुलेंसोबत बरोबरी करते. खुटाने कुठं उंटाचा मुका घ्यायचा असतो का? असे म्हणत अंधारे यांनी वाघ यांच्यावर ताशेरे ओढले. अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. माझं 15 वर्ष जुनं प्रकरण बाहेर काढून त्यावर काही लोक बोलत आहेत. पण बागेश्वर बाबाच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत. अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून माझ्याविरोधात आंदोलन करणारे सगळेच चुप्पी साधून आहेत, असे अंधारे म्हणाल्या.

पंडित नेहरूंवर बोलून देखील मोदींना नेहरूंना डॅमेज करता आलं नाही. महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनाही डॅमेज करता येत नाही. महापुरुषांवर बोलणं म्हणजे जीभ घसरली. चुकून बोललो असं नाही. हे लोक ठरवून बोलतात. ठरवून डॅमेज करतात. महापुरुषांना जाणीवपूर्वक डॅमेज केले जात असल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे.