विशाखापट्टणम आता आंध्र प्रदेशची नवी राजधानी होणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विशाखापट्टणम आता आंध्र प्रदेशची नवी राजधानी होणार

नवी दिल्ली, (प्रबोधन वृत्तसेवा) - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम ही राज्याची पुढील राजधानी असल्याची घोषणा केली आहे. खरं तर, 2014 मध्ये, जेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेशातून वेगळे झाले तेव्हा हैदराबादला 10 वर्षांसाठी दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हैदराबाद तेलंगणाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत आंध्र प्रदेशला 2024 पूर्वी राजधानीची घोषणा करावी लागली.

यापूर्वी 23 एप्रिल 2015 रोजी चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी सरकारने अमरावतीला आंध्र प्रदेशची पुढील राजधानी म्हणून घोषित केले होते. यानंतर 2020 मध्ये जगन सरकारनेच आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्या असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कर्नूलची नावे समोर आली. मात्र, नंतर वायएसआर काँग्रेस सरकारने हा निर्णय मागे घेत अमरावतीला राजधानी बनवण्याची तयारी केली.

विशेष म्हणजे वायएसआर काँग्रेस अमरावतीमधील जमीन घोटाळ्याचा टीडीपीवर सातत्याने आरोप करत आहे. विशेषत: टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. रेड्डी सरकारनेही या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अमरावतीतील अनेक ठिकाणांबाबत कृती आराखडा आधीच उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, चंद्राबाबू नायडू यांनी हे आरोप साफ फेटाळून लावले होते.