आज माईक ओढतात, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला... विनायक राऊतांची जीभ घसरली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आज माईक ओढतात, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला... विनायक राऊतांची जीभ घसरली

कोल्हापूर, (प्रबोधन न्यूज) - कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा सुरू आहे. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांच्यासह सध्याच्या राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. विनायक राऊत म्हणाले की, फडणवीस आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढतात, उद्या पॅन्ट ओढतील आणि त्यांना नागडे करून सोडतील. खोक्यांना बळी पडलेल्यांचं राजकीय आयुष्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या मुद्द्यावरुनही त्यांनी फडणवीसांना डिवचलं. राऊत म्हणाले, मला अमृता फडणवीस यांचं वाईट वाटतं. किती नवस केले त्यांनी, पण फडणवीस हे बहुरूपी आहेत हे दिल्लीने सिद्ध केलं. दिल्लीने फडणवीसांचा बकरा केला, असं विनायक राऊत म्हणाले.

संभाजीनगरचं नाव बदलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घोषित केला होता. ज्याला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावरुनही त्यांनी टीका केली आहे. विनायक राऊत म्हणाले, की हे करताना जनाची ना मनाची तरी वाटायला हवी. लाचारी पत्करली पण दिघे साहेबांचे तरी स्मरण करा, असं विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंना म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुर्दा पाडला. कपाळावर टिळा लावण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.