अजित पवारांनी स्वीकारले फडणवीसांचे चॅलेंज

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अजित पवारांनी स्वीकारले फडणवीसांचे चॅलेंज

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपने मोठा धक्का दिला. या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून भाजपने बाजी मारली. देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी खेळीमुळे भाजपने राज्यसभेत उल्लेखनीय कामगिरी केली. आता राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीचाही निकाल लागेल, असा दावा आता भाजपाकडून करण्यात येतो आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे चॅलेंज स्वीकारले आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी काठावर पास झाली असली तरी पराभवातूनच माणूस शिकतो, असेही ते म्हणाले आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर, कुणाकड़े कौशल्य आहे स्पष्ट होईल, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला होता. याकरिता अपक्ष उमेदवारांना मॅनेज करण्याचे कामही शिवसेनेकडे होते. त्यात राष्ट्रवादी आणि अजित पवार सक्रिय नव्हते असे सांगण्यात येत होते. विधान परिषद निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणेच या निवडणुकीतही सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निकालानंतरच कळेल कोणी कोणाला धोबीपछाड दिली ते.