उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार – आयुक्त पाटील

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार – आयुक्त पाटील

पिंपरी-चिंचवड, दि. 1 जून - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या आठ दिवसांत पिंपरी – चिंचवड महापालिकेतील बदलीस पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या इतर विभागात बदल्या केल्या जाणार आहेत, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील अनागोंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. याबाबत उच्च न्यायालयाने पिंपरी – चिंचवड पालिकेला अधिकारी आस्थापनेवरील व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत धोरण तयार करण्याचे आदेश दिले होते. त्या प्रमाणे पालिकेने बदली धोरण तयार केले. त्यानुसार एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व सहा वर्षे काम करणारे कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. तीन वर्षानंतर कर्मचा-यांकडील कामकाज विषय विभागातंर्गत बदल करणे अनिवार्य आहे.

यावर्षी एप्रिल महिना उलटून आणि मे महिना अखेर होऊनही धोरणाप्रमाणे बदल्या झालेल्या नाहीत. या संदर्भात आयुक्त पाटील म्हणाले की, बदली धोरणानुसार येत्या आठ दिवसांत आस्थापनेवरील पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या कल्या जातील सर्व बदल्या नियमानुसार केल्या जातील.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. अनेक अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. काही विभागात दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले कर्मचारीही आहेत. या धोरणानुसार यावर्षी देखील २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रशासनाने विभागप्रमुखांकडून बदलीस पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार दोनशेंहून अधिक अधिकारी, कर्मचारी बदल्यांसाठी पात्र ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.