राजे पडले एकाकी, दहा आमदारही मागे नाहीत, त्यामुळे अर्ज भरू शकत नाहीत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राजे पडले एकाकी, दहा आमदारही मागे नाहीत, त्यामुळे अर्ज भरू शकत नाहीत

मुंबई, दि. 26 मे - आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार असल्याच्या घोषणा करणाऱ्या संभाजीराजेंच्या पाठीमागे अनुमोदन द्यायला 10 आमदारही नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढावू शकते. अपक्ष 13 आमदार आहेत. परंतु अपक्ष 13 सोडाच इतर बहुजन विकास आघाडीसारखे इतर छोटे पक्षही संभाजीराजेंच्या बाजूनं नाहीत. त्यामुळे संभाजीराजेंच्या उमेदवारीला अनुमोदन देण्यासाठी त्यांच्याकडे 10 आमदारही नाहीत. त्यामुळेच संभाजीराजे उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा आहे.

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी 41 आमदारांच्या मतांची गरज असते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडे 27 मतं अतिरिक्त असली तरी भाजपकडे 22 मतं शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या उरलेल्या संख्येनुसार जर संभाजीराजेंना पाठिंबा दिला तरी संभाजीराजे निवडून येणं मुश्कील आहे.

खरं तर संभाजीराजेंना अद्याप कोणत्याच पक्षाने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे. कारण उमेदवारी अर्जच दाखल करण्यासाठी दहा आमदार सूचक म्हणून लागतात. पण कुठल्या पक्षाचा पाठिंबा नसल्यानं संभाजीराजे हे दहा आमदार कुठून आणणार हा प्रश्नच आहे.

सध्या महाविकास आघाडीच्या जवळ आठ, तर विरोधात भाजपकडे पाच अपक्ष आमदार आहेत. पण संभाजीराजेंना अद्यापही कुठल्या आमदाराने पाठिंबा दिलेला नाही. विशेष म्हणजे शिवसेनेनं मुद्दामहून शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुखाच्या रूपात संजय पवारांना उमेदवारी दिल्यानं कोल्हापूरचा आणि त्यातही मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे हा संभाजीराजेंवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचंही बोललं जातंय. एक तर शिवसेनेचा पर्याय स्वीकारा किंवा राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्या, सध्या हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत.

भाजपही सध्या त्यांना राज्यसभेवर निवडून आणू शकत नाही. तसेच इतर कोणाची खासदारकी काढून त्यांनाही खासदार म्हणून करणार नाहीत. त्यामुळे संभाजीराजे कोणता मार्ग स्वीकारतात हे त्यांच्या राजकीय वाटचालीचीही दिशा ठरवणारं आहे.