राष्ट्रपती राजवट लावण्याचा टोकाचा निर्णय केंद्र सरकार घेणार नाही – शरद पवार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रपती राजवट लावण्याचा टोकाचा निर्णय केंद्र सरकार घेणार नाही – शरद पवार

पुणे, दि. २५ एप्रिल - राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी विरोधकांनी केली आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकापर्यंत केंद्र सरकार जाणार नाही असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख आणि शिवीगाळ करणे योग्य नाही. मुख्यमंत्रीपद हे एक घटनात्मक पद आहे त्यांच्याविषयी अपशब्द वापरणे अयोग्य आहे. असे म्हणत पवारांनी विरोधकांना सुनावले.

पवार पुढे म्हणाले की, मी येईन म्हणणारे येऊ शकले नाहीत, त्यामुळे ते आता अस्वस्थ झाले आहेत. असे म्हणत पवारांनी फडणवीसांना टोला लगावला. राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकापर्यंत कोणी जाणार नाही. कारण कोल्हापूर पोटनिवडणुकीत विरोधकांना चांगला आरसा दाखवला. असे पवार म्हणाले.

देशातील अनेक राज्यात यंदा वीज संकट असून विजेची कमतरता सर्वत्र आहे. वीज संकटावर मार्ग काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. सगळ्यांनी बसून यावर मार्ग काढावा. आणखी दीड महिने वीजेचे संकट हे कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले.