रेंजहिल परिसरातील झोपड्यांचे मुंढवा येथे पुनर्वसन करण्याची मागणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रेंजहिल परिसरातील झोपड्यांचे मुंढवा येथे पुनर्वसन करण्याची मागणी
रेंजहिल परिसरातील झोपड्यांचे मुंढवा येथे पुनर्वसन करण्याची मागणी
रेंजहिल परिसरातील झोपड्यांचे मुंढवा येथे पुनर्वसन करण्याची मागणी

पुणे, दि. २१ एप्रिल (प्रतिनिधी) - रेंजहिल्स खडकी या भागा लगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये 30 ते 40 वर्षांपासून या वस्तीत सर्व जाती धर्माचे लोक राहत आहेत. दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सुमारे 25 झोपडीधारक बेघर झाले आहेत. याबाबत दिनांक 19 एप्रिल रोजी दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी प्रशासनाशी बोलून ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी रेल्वे प्रशासनातर्फे पुन्हा 16 तारखेला अतिक्रमणाच्या इशाऱ्याची नोटीस या झोपडपट्टीधारकांना देण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसीबाबत आज दलित पॅंथरच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेवर झोपडपट्टीधारकांसह आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून होणारी कारवाई तत्काळ स्थगित करावी आणि झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावं या मागणीचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले. याप्रसंगी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम, शहर अध्यक्ष शैलेंशभाऊ चव्हाण, रिपाइंचे (आ) मातंग आघाडी महाप्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, रिपाइंचे कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र निलेशभाऊ आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार युनियन कार्याध्यक्ष पुणे जिल्हा चंदनभाऊ जोशी, सनीदादा पंजाबी, विशालभाऊ ओव्हाळ, सिंधु कलशेट्टी, टिनू भोसले आदी पदाधिकारी कार्यकर्ते झोपडपट्टीधारक उपस्थित होते.

हे लोक 30 ते 40 वर्षापासून या वस्तीत राहत आहेत. वस्तीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची येणाऱ्या महिन्यामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक शाखेच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन परीक्षा देखील सुरू आहेत ही बाब लक्षात घेता, हे अतिक्रमण थांबवावे व झोपडपट्टीधारकांचे योग्य पुनर्वसन करावं अशी विनंती करण्यात आली.