रहाटणी, पिंपळे सौदागर मध्ये कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा – नाना काटे

रहाटणी, पिंपळे सौदागर येथील पाणीपुरवठा सुरळित न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रहाटणी, पिंपळे सौदागर मध्ये कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा – नाना काटे

पाणी पुरवठा सुरळीत ना झाल्यास हंडा मोर्चा काढणार

टँकर मागवावे लागत असल्याने सोसायट्यांना आर्थिक झळ

पिंपरी – प्रभाग क्र. २८ मधील रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात गेली कित्येक दिवस कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.  महानगरपालिकेतर्फे दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय तो पण अपुरा व कमी दाबाने.

तसेच या परिसरात सोसायट्यांची संख्या जास्त असून कमी व अपुऱ्या होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सोसायट्यांना पाण्याचे खासगी टॅकर मागवावे लागत आहे. त्यामुळे  सोसायटीधारकांना आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत असून, लाखो रुपये कर भरून सुद्धा महानगरपालिका दैनंदिन गरज असलेला पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या दररोजच्या तक्रारींच्या रोषास लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला सामोरे जावे लागत आहे असे माजी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी सांगितले.

नाना काटे पुढे म्हणाले की, पाणीपुरवठ्याच्या संबंधित विभागाचा अधिकारी व कर्मचारी यांना विचारले असता टाळाटाळ केली जाते, उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे पाण्याची नवीन टाकी बांधून एक वर्ष झाले मात्र  आजपर्यंत या टाकीद्वारे सोसायट्याना अद्याप पाणीपुरवठा चालू केलेला नाही. मार्च महिना चालू होऊन पंधरा दिवस झालेले आहेत, उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यातच दिवसाआड पाणी आणि तोही कमी दाबाने, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्तांनी या प्रश्नात त्वरित लक्ष घालावे व रहाटणी, पिंपळे सौदागरमधील नागरिकांची दैनदिन गरज असलेली पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी. तशा सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीप्रश्न न सुटल्यास नाईलाजाने महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असेही नाना काटे यांनी म्हटले आहे.