परमात्म्याकडून उत्पन्न सृष्टीत दुःख नाही, परमात्मा सदा आनंद स्वरूप - सदगुरु  शिवकुमार महास्वामीजी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

परमात्म्याकडून उत्पन्न सृष्टीत दुःख नाही, परमात्मा सदा आनंद स्वरूप - सदगुरु  शिवकुमार महास्वामीजी

पिंपरी, - परमात्म्याकडून उत्पन्न सृष्टीत दुःख नाही. परमात्मा हा सदा आनंद स्वरूप आहे. दुःख जीवाने निर्माण केले परमात्म्याने नाही असे प्रतिपादन प.पू. सद्गगुरू शिवकुमार महास्वामीजी, बिदर यांनी येथे केले.

दि.28 जानेवारीपासून एक फेब्रुवारी पर्यंत भोसरी येथे प.पू. सदगुरू शिवकुमार महास्वामीजी, बिदर यांचा अध्यात्मिक सोहळा गुरुदर्शन व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळात ही प्रवचने होणार आहेत. सोमवारी  प्रवचनापूर्वी सायंकाळी भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी माझे माहेर पंढरी, विठू माऊली तू माऊली जगाची, कानडा राजा पंढरीचा आदी भक्ती गीते सादर करण्यात आली

यानंतर "द्रव्य असता न धर्म करी नागवला तो राजद्वारी" या विषयावर प.पू. सदगुरू शिवकुमार महास्वामीजी यांचे प्रवचन झाले. यावेळी ते म्हणाले की, आज प्रत्येकजण विविध कारणांनी त्रस्त आहे जगायचे की मरायचे असा प्रश्न अनेकांना पडत आहे मरावे असे वाटणे ही चूक कोणाची ? असा सवाल करत परमात्म्याची नक्कीच नाही असे सदगुरू शिवकुमार महास्वामीजी यांनी सांगितले.

कोणत्याही वस्तूचा उपयोग केला तर सुख मिळते सदुपयोग केला तर पुण्य मिळते व दुरुपयोग केल्याने पाप मिळते. परमेश्वराने दिलेल्या शरीराचा व मानवी जन्माचा उपयोग कसा करावा हे मूर्ख माणसाला ज्ञात नाही. त्यामुळे कुटुंबात कोणा ना कोणाकडून तो दुःखी होत आहे असे सदगुरू शिवकुमार महास्वामीजी यांनी सांगितले.

परमात्मा सदा आनंद स्वरूप असतो त्याच्याकडून दुःख येत नाही, मग दुःखाची निर्मिती कोणी केली असा सवाल करून श्री सदगुरू शिवकुमार महास्वामी म्हणाले की, आपल्याला अनुकूल ते सुख आणि प्रतिकूल ते दुःख असे आपण मानतो. घोंगडी अथवा ब्लॅंकेट हिवाळ्यात हवेसे वाटते उन्हाळ्यात तेच नकोसे होते तशीच ही स्थिती आहे. परमात्म्याकडून उत्पन्न सृष्टीत दुःख नाही. सृष्टी ही दोन प्रकारची आहे ईश्वर सृष्टी व जीवसृष्टी. सृष्टी  परमात्म्याच्या संकल्प मुळे निर्माण झाली आहे परमात्मा सच्चिदानंद ब्रह्म आहे दुःख जीवाने निर्माण केले आहे परमात्म्याने नाही. मी, माझा या आसक्ती मुळे तुम्ही दुःख निर्माण केले आहे. परमात्म्याने शरीर दिले आहे त्याचा सदुपयोग करायला हवा परमेश्वराने तुम्हाला जे दिले आहे ते तुम्हाला त्याच स्वरूपात परत करावयाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे असे श्री सदगुरू शिवकुमार महास्वामी म्हणाले.

लहान बालकांमध्ये अहंकार प्रेम वासना नसते मात्र आपण मोठे झाल्यानंतर मी सावकार मी पंडित या अभिमान व अहंकारामुळे सारा नाश होतो ज्याच्या मनात अहंकार निर्माण होतो त्याचे सर्व काम निरर्थक असते दुःख जीवामुळे होते प्रपंचात विचारपूर्वक पावले टाका सदुपयोगाने संसार चालेल असा सल्लाही शिवकुमार महास्वामी यांनी दिला.

श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री सदगुरू सिद्धारूढ अध्यात्मिक समिती, पुणेचे रमेश गंताले, अमरनाथ माना, रमेश कोहल्ली, राजशेखर संगोळगी, परमपूज्य शंकरानंद स्वामीजी संस्थापक तसेच अध्यक्ष अमरनाथ माना, सचिव रमेश गंताले, रमेश कोहल्ली, शिवपुत्र संतपुरे ,सूर्यकांत मुरुड, रवींद्र चांगलेरा, अण्णासाहेब बिरादार, चंद्रशेखर गाणगेर, वीरेंद्र काळे, संतोष बिराजदार, भक्ती धनुरे यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सदगुरू सिद्धारूढ अध्यात्मिक समिती पुणे यांनी केले आहे.