हे बाबा कोण आहेत? धीरेंद्र शास्त्रींवर अजित पवार संतापले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

हे बाबा कोण आहेत? धीरेंद्र शास्त्रींवर अजित पवार संतापले

मुंबई (प्रबोधन वृत्तसेवा) - धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. खरंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले होते की, त्यांची पत्नी संत तुकाराम महाराजांना रोज मारत असे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कोण आहेत हे बाबा? महाराष्ट्र सरकारने अशा लोकांवर कडक कारवाई करावी.

या वक्तव्याप्रकरणी धीरेंद्र महाराज (बागेश्वर बाबा) यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील अजित पवारांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करण्याचे काही जणांचे काम जाणीवपूर्वक चालले आहे. बेरोजगारी, महागाई यासारखे महत्त्वाचे मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच अशी वक्तव्ये केली जात आहेत.

अजित पवार म्हणाने की महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्याविरोधात नव्या कायद्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. आगामी अधिवेशनात या संदर्भात मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. वारकरी संप्रदायाकडून देहू संस्थान येथे आंदोलन करुन धीरेंद्र शास्त्रींचा (बागेश्वर बाबा) निषेध करण्यात आला होता. यानंतर बोलताना अजित पवारांनी धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी केलेल्या वक्तव्य हे निषेधार्ह असून त्यामुळे व्यथित झालो असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. राज्यातील जनतेच्या वतीने मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असे सांगताना आम्ही आगामी अधिवेशनात बेताल वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत त्यासाठी एक कायदा करावा अशी मागणी करणार आहोत असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

महारापुरुषांच्या विरोधात जे वाचाळवीर बोलत असतात, यामुळे राज्यात वातावरण खराब होत आहे, कुणाच्यातरी भावना दुखावल्यामुळे कायदा हातात घेतला जातो, कोण शाई फेकण्याचा प्रयत्न करतो, हे सर्व थांबविण्यासाठी महापुरुषांवचा अपमान होऊ नये यासाठी कायदा केला पाहिजे असे अजित पवारांनी म्हटले आहे.