शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा थेट उद्धव ठाकरेंना सल्ला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा थेट उद्धव ठाकरेंना सल्ला

नाशिक, (प्रबोधन न्यूज) - देवेंद्र फडणवीसांची चाल तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्हाला ते ओळखून दुरूस्त व्हावं लागेल. नाही दुरूस्त केली तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा थेट सल्ला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना दिला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

राज्यसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करतानाच आता आपले काय चुकले याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. ते काय आपली आरती करणार नाही. त्यांचा खेळी यशस्वी ठरली आहे. शेवटी विश्वास ठेवावा लागतो, असे म्हणत महाविकास आघाडीमध्ये कोटा ठरवण्याबाबत वाद नव्हता. कोटा कमी केला काय किंवा वाढवला काय. लोक सांभाळण्यात आम्ही कमी पडलो. ते सांभाळले असते, तर असे झाले नसते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भाजपाला मिळालेली मदत आम्हाला मिळाली असती तर शिवसेनेचा दुसरा उमेदवार विजयी झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. विरोधक यशस्वी झाले. आता आम्हाला चिंतन, मनन करण्याची गरज आहे. शिवसेनेला फायद्याचे होईल ते वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल. आत्ताच योग्य निर्णय घ्यावा लागेल, असेही पाटील म्हणाले.

आपली एक जागा गेली याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली, त्याबद्दल त्यांचे कौतुक करायलाच पाहिजे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांचे कौतुकही केले. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या या पराभवाबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वालाच गंभीरतेने विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, अनपेक्षित असा निकाल लागला आहे. व्हीप असल्याने पक्षाच्या लोकांचे चुकलेले नाही, मात्र १० आमदारांनी गडबड केली आणि विरोधक त्यांच्या खेळीत यशस्वी झाले, असा आरोप त्यांनी केला.