पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पद्मश्री लक्ष्मण माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ राजेश टोपे, आमदार बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, लक्ष्मण माने यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आज प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे पक्षात स्वागत करत आहे. गेली अनेक वर्षे माने राज्यातील भटक्या विमुक्त आणि वंचित घटकांसाठी काम करत आले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेली ३० ते ४० वर्षे वाड्या-वस्त्यांवर जाऊन वंचित घटकांना एकत्र करत आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. आदरणीय पवार साहेबांनी आजवर समाजातील उपेक्षित वर्गासाठीच अधिक निर्णय घेतले आहेत. समाजात अजूनही असा मोठा वर्ग आहे की ज्यांना न्याय मिळाला नाही. आता त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

यावेळी लक्ष्मण माने यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी नेहमीच भटके-विमुक्त घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. या वर्षात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. या वर्षाचे निमित्त साधून ३१ ऑगस्ट रोजी विमुक्त दिन साजरा करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेऊन विमुक्त दिन साजरा करा, असे आवाहनही त्यांनी केले.