...तर तुमचेही कुटुंब तुरूंगात जाईल – संजय राऊतांची फडणवीसांना धमकी

आजही एकनाथ खडसेंचे जावई तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांच्यासह अनेक विरोधकांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणले जात आहेत.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

...तर तुमचेही कुटुंब तुरूंगात जाईल – संजय राऊतांची फडणवीसांना धमकी

मुंबई - विरोधकांना नेस्तनाबुत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणण्याचे घाणेरडे राजकारण राज्यात देवेंद्र फडणवीसांनी सुरू केले. केंद्रात मोदी आणि शहांनी असे राजकारण सुरू केले, अशी टीका आज खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच, तुमचेही कुटुंब तुरुंगात जाईल, असे पुरावे आमच्याकडे आहेत. तोंड उघडायला लावू नका. अन्यथा महाराष्ट्रात स्फोट होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना  दिला.

संजय राऊत म्हणाले, राजकारणात कुणाच्याही कुटुंबापर्यंत पोहोचायचे नाही, अशी शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे आम्ही असे घाणेरडे, दळभर्दी राजकारण कधीच केले नाही. मविआतील घटक पक्षांनीही असे राजकारण केले नाही. मात्र, राज्यात ही कटुता देवेंद्र फडणीसांनी आणली.

संजय राऊत म्हणाले, आजही एकनाथ खडसेंचे जावई तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांच्यासह अनेक विरोधकांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणले जात आहेत. आमच्याकडेही तुमचे कुटुंब तुरुंगात जाईल, असे पुरावे आहेत. तोंड उघडायला लावू नका. अन्यथा महाराष्ट्रात स्फोट होईल. राजकारणात कुणाचेही कुटुंब आणू नका.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, "ही त्यांची लायकी आहे. ज्या शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती, 2014 साली. स्वाभिमानासाठी. 40-45 जणांवर तुकडे फेकलेले आहेत. यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील. ते तुकडे तोंडात ठेवूनच चघळत त्यांना जगावं लागेल. त्यांना कुठला स्वाभिमान आहे."