अनिल परबांच्या अडचणी वाढल्या; साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

आज सकाळी ईडीचे एक पथक सदानंद कदम यांच्या घरी पोहचले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेतले आहे. अधिकची चौकशी करण्यासाठी सदानंद कदम यांना घेऊन इडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अनिल परबांच्या अडचणी वाढल्या; साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

मुंबई - साई रिसॉर्ट प्रकरणीठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण त्यांचे अत्यंत जवळचे असलेले सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ईडीचे एक पथक सदानंद कदम यांच्या घरी पोहचले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेतले आहे. अधिकची चौकशी करण्यासाठी सदानंद कदम यांना घेऊन इडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

ईडीने सदानंद कदम यांना ताब्यात घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. 

आपल्या बोली भाषेत ताब्यात घेणं आणि अटक करणं हा टेक्निकल शब्दांचा खेळ आहे. एखाद्याला ताब्यात घेतल्यानंतर अटक करणं आणि कोर्टात नेणं हा ईडीचा भाग आहे. एकदा कोर्टात प्रकरण गेलं की तो कोर्टाचा भाग होतो. आता सदानंद कदम आणि अनिल परब यांचे आणखी घोटाळे बाहेर येतील. साई रिसॉर्ट हा एक घोटाळा आहे. केबलचा अजून घोटाळा आहे. केबल घोटाळ्यात किती खंडणी मागितली त्याचा आकडा आल्यावर तुम्हाला आश्चर्य होईल. त्यांना हिशोब तर द्यावाच लागेल, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. दापोलीत साई रिसोर्ट घोटाळा झाला. ईडीने सदानंद परब यांना अटक केली आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची खेडमध्ये झालेली सभा यशस्वी होण्यामागे सदानंद कदम यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच सुडबुद्धीनं ही कारवाई केल्याचं विनायक राऊतांनी म्हटलं आहे.

या घटनेनंतर रामदास कदम काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.