परमबीर सिंग ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार; निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

परमबीर सिंग ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार; निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा 

मुंबई -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग सध्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत, खंडणीसारख्या गंभीर आरोपाखाली परमबीर सिंह यांच्या चौकशी सुरू आहेत. सचिन वाझेचं प्रकरण बाहेर आल्यानंतर परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या.आधी त्यांची तातडीने बदली करण्यात आली आणि नंतर खंडणी, अधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ, बुकींकडे पैसे मागितल्याचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात परमबीर सिंह कोर्टातही जाणार असल्याचे समजते. 
गेल्या काही दिवसांपासून सतत परमबीर सिंह विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पहायला मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांची तात्काळ बदली करत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नागराळे यांची नियुक्ती केली. त्यानंतर परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांनी वाझेला खंडणीचं टार्गेट दिल्याचे आरोप केले आणि अनिल देशमुखांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टाचा रस्ता दाखवला. मुंबई हायकोर्टात आल्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आणि देशमुखांच्या अडचणी वाढल्या. मात्र त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही खंडणी मागितल्याचे गंभीर आरोप झाले. आणि परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं. आता तेच निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. त्यामुळे आता कोर्टात धाव घेतल्यावर परमबीर सिंह यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.