भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश, गडकरींनी पुन्हा साधला केंद्रावर निशाणा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश, गडकरींनी पुन्हा साधला केंद्रावर निशाणा

नागपूर, (प्रबोधन वृत्तसेवा) - भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. भारत देश समृद्ध असूनही बहुतांश लोक गरिबी, भूक, बेरोजगारी, जातिवाद, अस्पृश्यता, महागाई या समस्यांनी होरपळत आहेत. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत चालली आहे, ही दरी भरून काढण्याची गरज आहे अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वास्तव समोर आणले आहे. ते नागपूरमध्ये  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारत विकास परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. गडकरी यांचे हे वक्तव्यदेखील व्हायरल होत असून गडकरींनी पुन्हा केंद्रावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

ब्रिटनला मागे टाकून भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालातून समोर आले आहे. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी परखड भाष्य केले आहे.

गडकरी पुढे म्हणाले की, देशातील तब्बल 124 जिल्हे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीत मागे आहेत. देशात शहरी भागात खूप विकास झाला आहे, पण ग्रामीण भागात सुविधा आणि संधींचा अभाव असल्याने मोठी लोकसंख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे या 124 जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी एकजुटीने काम करावे लागेल. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्यासाठी शिक्षण, आरोग्य यासह अन्य क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचेही ते या वेळी म्हणाले.