भाजप नेत्याचा मुलगा अंकिताला सेक्स वर्कर बनवणार होता - राहुल गांधी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजप नेत्याचा मुलगा अंकिताला सेक्स वर्कर बनवणार होता - राहुल गांधी

उत्तराखंड (प्रबोधन वृत्तसेवा) - राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान उत्तराखंडमध्ये 19 वर्षीय रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आणि म्हटले की, या घटनांवरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा दिसून येते. RSS कडून स्त्रियांना "वस्तू" म्हणून पाहिले जाते. एका रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या अंकिताची रिसॉर्ट ऑपरेटर पुलकित आर्य आणि त्याच्या दोन कर्मचाऱ्यांसह ऋषिकेशजवळील चिला कालव्यात ढकलून हत्या करण्यात आली होती. मुख्य आरोपी पुलकित हरिद्वारचे माजी भाजप नेते विनोद आर्याचा मुलगा आहे. मात्र, ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपने आर्य यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मुलीच्या हत्येचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, "हॉटेलचा मालक, भाजपचा नेता, हॉटेल चालवणारे त्यांचे मुलगे एका तरुणीला वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत होते. जेव्हा तिने वेश्या होण्यास नकार दिला तेव्हा तिचा मृतदेह एका कालव्यात सापडला होता." गांधी यांनी आरोप केला आहे की, "भाजप भारतातील महिलांशी असे वागते." सर्वात लाजिरवाणे उदाहरण म्हणजे भाजप आणि आरएसएस कशी वागणूक देतात ते या निमित्ताने उघड झाले आहे. या विचारसरणीने भारत कधीही यशस्वी होऊ शकत नाही. जो देश आपल्या महिलांचा आदर किंवा सक्षमीकरण करण्यास शिकू शकत नाही तो कधीही काहीही साध्य करू शकत नाही.

'भारत जोडो यात्रे' दरम्यान येथील थचिंगणाडम हायस्कूलच्या बाहेर 'जस्टिस फॉर अंकिता', 'भारतीय महिलांसाठी न्याय' आणि 'बेटी वाचवा भाजपकडून' असे फलक घेतलेल्या लोकांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. राहुल गांधींनी लोकांना आणि काँग्रेस नेत्यांना भंडारींच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळण्यास सांगितले. "तुम्ही किती शक्तिशाली आहात किंवा तुमच्याकडे किती पैसा आहे याने काही फरक पडत नाही, आम्ही तुम्हाला महिलांशी असे वागू देणार नाही," असे ते  म्हणाले. त्यांची राजवट गुन्हेगारांसाठी समर्पित आहे. आता भारत गप्प बसणार नाही.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) सरचिटणीस आणि प्रभारी (संपर्क) जयराम रमेश यांनी ट्विट केले की, "भारत जोडो यात्रेदरम्यान आज संध्याकाळी पदयात्र्यांनी उचललेले प्रत्येक पाऊल मुली आणि महिलांवर सुरू असलेल्या अत्याचारांची आठवण करून देणारे आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे उत्तराखंडमधील अंकिताचे संतापजनक प्रकरण. यापूर्वी बिल्किस बानोच्या प्रकरणात न्यायाची थट्टा करण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या ट्विटसह गांधींसोबत फलक घेऊन फिरत असलेल्या लोकांची छायाचित्रेही शेअर केली आहेत.

गांधींनी आपल्या भाषणात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यावर या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा आरोपही केला. काँग्रेसची 3,570 किमी लांबीची आणि 150 दिवसांची भारत जोडी यात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल. 'भारत जोडो यात्रा' 10 सप्टेंबरच्या संध्याकाळी केरळमध्ये पोहोचली होती. केरळच्या सात जिल्ह्यांतून 19 दिवसांत 450 किमी अंतर कापून ते 1 ऑक्टोबरला कर्नाटकात पोहोचेल.