राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; अडचणी वाढल्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; अडचणी वाढल्या

अयोध्या, दि. 10 मे – राज ठाकरे यांनी अयोद्या दौऱ्यापूर्वी माफी मागितली नाही तर पुढील काळात झारखंड, बिहार, छत्तीसगडमद्ये राज ठाकरेंना येऊ न देण्याचा ठराव महासभेत संमत करण्यात आला. ही महासभा भाजपचे खासदार बृजभूषण यांनी बोलावली होती. राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी 5 लाख लोक अयोध्येत येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. सात दिवसांत माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा अल्टीमेटम सिंह यांनी दिला आहे. राज ठाकरेंसाठी मंगळवारी महासभेचे आयोजन केले होते. या सभेत अनेक साधू-संत, भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महासभेमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात ठराव करण्यात आला आहे. ठाकरे यांनी जनतेची माफी मागितली नाही तर साधू-संतांची माफी मागावी, आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांनी महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर अन्याय केला आहे. ते यापुढे सहन केले जाणार नाही. त्यामुळे आधी त्यांनी माफी मागावी. त्याशिवाय त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. आता जर त्यांनी माफी मागितली नाही तर यापुढे आयुष्यात ते कधीच अयोध्यात तर सोडा पण झारखंड, बिहार, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश इथे कुठेही त्यांना यायचं असेल तर विरोध होईल, असं सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी ठाकरेंना सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातील अडचणी वाढल्या आहेत.

तसेच राज ठाकरेंना माफी मागण्याची एक संधी आहे. माफी मागितली नाही तर झारखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार याठिकाणी आयुष्यात कधीही येऊ शकणार नाही. तुम्ही केलेले पाप तुम्हालाच आठवेल. राज ठाकरेंना माफ करायचं आहे परंतु ते माफी मागायला तयार नाही. साधूंची माफी मागितल्यास अयोध्येत येऊ देणार. संताची माफी मागा तुम्ही देशाचे नेते व्हाल. महाराष्ट्र माझ्यासाठी आदरणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मी आदर्श मानतो. संत समाजही छत्रपतींना आदर्श मानतो. माझा विरोध राज ठाकरे व्यक्तीला आहे. महाराष्ट्राला नाही असंही बृजभूषण सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे कधी महाराष्ट्राच्या बाहेर आले नाहीत त्यामुळे हा विरोध करता आला नाही. आता समोर यावं २००८ मध्ये उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली. तेव्हापासून आमचा हा राग आहे. माझं वैर महाराष्ट्राशी नाही. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी ५ लाख लोकांनी ५ जून रोजी अयोध्येत जमावं असं आवाहनही बृजभूषण सिंह यांनी केले आहे.