केजरीवालांनी भाजपविरुद्ध दंड थोपटले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

केजरीवालांनी भाजपविरुद्ध दंड थोपटले

नवी दिल्ली, दि. २३ मार्च – देशातील दोन राज्ये हातात आल्यानंतर केजरीवालांची ताकद चांगलीच वाढलीय. इतके दिवस भाजपची दादागिरी सहन करणाऱ्या आम आदमी पक्षाचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता भाजपला खुले आव्हान दिले आहे. दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुका वेळेवर झाल्या तर भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव होऊन आम आदमी पक्षाला मोठा विजय मिळेल. तसे झाले नाही तर मी राजकारण सोडून देईन असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

पंजाबमधील आम आदमीचा एकहाती विजय पाहून भाजपला धास्ती वाटायला लागली आहे. त्यामुळे भाजपने दिल्लीतील तीनही महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, असे केजरीवाल म्हणाले आहेत.

भाजपला आव्हान देताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, हिंमत असेल तर निवडणुका वेळेवर घ्या आणि जिंकून दाखवा. तुम्ही निवडणुका जिंकल्या तर आम्ही राजकारण सोडू. भाजपा स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो पण त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते. तुम्ही दिल्लीच्या निवडणुकीला घाबरलात. तुमच्यात हिंमत नाही, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

केजरीवाल म्हणाले की, दिल्ली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणे हा इंग्रजांना देशातून हाकलून देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आहे. आज ते पराभवाच्या भीतीने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत. उद्या ते राज्यांच्या आणि देशाच्या निवडणुका पुढे ढकलणार आहेत. दिल्लीतील तिन्ही कॉर्पोरेशन एकत्र येणार आहे म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत. फक्त यासाठी निवडणुका पुढे ढकलता येतात का ? उद्या ते गुजरात गमावत असतील म्हणून ते गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करत आहेत, अशी काहीतरी कारणं देऊन लोकसभा निवडणुका टाळता येतील का असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.