प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत मेळाव्याचे आयोजन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत मेळाव्याचे आयोजन

      पिंपरी , (प्रबोधन न्यूज )    -       विद्यार्थ्यांना  घडविण्याचे काम शिक्षक करतातच, पण पालकांनीही आपल्या पाल्यासोबत रोज संवाद साधावा तसेच त्याच्या अभ्यासाकडे, आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यांनी केले.

पिंपरी चिंचवड     महापालिकेच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अधिकारी तसेच विद्यार्थी, पालक यांच्या मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

या मेळाव्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि मुख्याध्यापक, शिक्षक संवर्ग, पालक वर्ग, विद्यार्थी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 आयुक्त शेखर सिंह म्हणाले, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने पालकांपर्यंत सुचना पोहोचवल्या पाहिजेत. पालकांनीही आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यार्थ्याचा अभ्यास, आरोग्य, शारिरिक, सर्वांगीण प्रगतीबाबत पालकांनी संवाद साधला पाहिजे तसेच थोडा वेळ काढून आपल्या पाल्याच्या आहाराकडे, अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या पाल्याचा कल, त्याच्यातील प्रतिभा ओळखून पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांचीही त्यामध्ये महत्वाची भूमिका आहे.  आपला केंद्रबिंदू हा आपल्या शाळेतील विद्यार्थी आहे ज्याला आपल्याला घडवायचं आहे. त्याचा शारिरीक, बौद्धिक, मानसिक विकास कसा होईल यावर लक्ष केंद्रित करा. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता योग्य आहे का आणि नसेल तर त्यावर त्वरित योग्य ती पाऊले उचलून गुणवत्ता कशी वाढवता येईल याकडे विशेष लक्ष व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी दिले पाहिजे. मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना महापालिका चांगल्या नियोजनासाठी सहाय्य करत असते. व्यवस्थापन समिती किंवा पालकांनी केलेल्या सूचनांचा निश्चितपणे विचार करून याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. 

ज्या १० विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून शिष्यवृत्ती मिळवली त्यांना महापालिकेच्या वतीने भारत दर्शनासाठी पाठविण्यात येणार आहे. या सहलीमध्ये काही शिक्षकांचाही समावेश असणार आहे. हा उपक्रम पुढेही राबविण्यात येईल आणि जे शिक्षक चांगले काम करतील त्यांना गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत पाठविण्यात येईल तसेच त्यांचा सन्मान करण्यात येईल असेही आयुक्त शेखर सिंह यावेळी म्हणाले.

महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, महापालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून त्याची सर्व माहिती त्यांच्या पालकांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्त तपासणी, शारिरीक आजार, अपंगत्व अशा सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येणार असून विद्यार्थ्याला कोणत्याही आजाराची लक्षणे आढळली तर त्याला चांगल्या रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर वेळेत योग्य ते उपचार करण्यात येतील. महापालिका थेट पालकांच्या मोबाईलवर पाल्याचा आरोग्य अहवाल पाठवणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषक अन्न पुरविणे आणि त्याची गुणवत्ता चांगली ठेवणे गरजेचे आहे. शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. व्यवस्थापन समिती आणि शाळांनी समन्वय साधून या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना रोज शाळेत येण्यासाठी कसे प्रोत्साहन देण्यात येईल किंवा कोणकोणत्या उपाययोजना राबविण्यात येतील याच्यावरही काम केले पाहिजे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत नाव आलेल्या १० विद्यार्थ्यांचा यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये युवराज राठोड, वाजित शेख, क्षितीज कामने, शायद शेख, आराध्या चव्हाण, त्रिषा शिरसाठ, परिक्षा ठाकूर, दत्तप्रसाद वाळेकर, महेंद्रकुमार महातो, प्रगती बडगे या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. 

शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी, सदस्य तसेच शिक्षक आणि पालकांनी मांडलेल्या सूचनांवर आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

या मेळाव्याचे प्रास्ताविक शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी केले आणि शालेय उपक्रमांची तसेच मेळाव्यासंबंधित सविस्तर माहितीही त्यांनी दिली.