मुंबईत राज्यपाल भवनासमोर सोमवारी काँग्रेस आंदोलन करणार

ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून देशात काय राजकारण केले जात आहे. हे आता देशातल्या प्रत्येक माणसाला माहिती झाले आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुंबईत राज्यपाल भवनासमोर सोमवारी काँग्रेस आंदोलन करणार

मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग या मुद्द्यावर सोमवारी १३ मार्चला मुंबईत राज्यपाल भवनासमोर कॉंग्रेस आंदोलन करणार आहे. कालच उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत ईडीच्या कारवाया संदर्भातले कागद किरीट सोमय्याकडे कसं काय पोहोचतात? ईडीची कारवाई कुठे होणार, हे कोणालाच माहीत नसताना किरीट सोमय्यालांना कसं माहीत होतं? असे प्रश्न न्यायालयाने विचारले असल्याचे नाना पटोले म्हणाले.

ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून देशात काय राजकारण केले जात आहे. हे आता देशातल्या प्रत्येक माणसाला माहिती झाले आहे. आता तर उच्च न्यायालयानेही यावर प्रश्‍न उपस्थित केले आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात सक्तवसुली संचलनायल अर्थात ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईत भाजप नेते किरीट सोमय्या हे महत्त्वाचा दुवा ठरले आहेत. राज्यातील कोणत्याही नेत्यावर केंद्रीय यंत्रणांकडून विशेषत: ईडीकडून होणाऱ्या कारवाईची कुणकुण किरीट सोमय्या यांना आधीच लागते. त्याआधारे किरीट सोमय्या हे सोशल मीडियावरुन संबंधित नेता तुरुंगात जाणार, असा इशारा देतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढच्या काही तासांमध्येच संबंधित नेत्यावर ईडीची धाडही पडते. असाच काहीसा प्रकार शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याबाबत घडला.

किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, ठाकरे सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला होता. पण ते माझ्यावरील एका पैशाचाही आरोप सिद्ध करु शकले नाहीत. किरीट सोमय्या काय करतो, त्याला माहिती कुठून मिळते, असा प्रश्न विचारला जातो. होय मी, ईडीकडून कारवाई होण्यासाठी धडपड करतो, जिद्दीने लढतो. त्यामुळेच महाराष्ट्राली लोकांचा किरीट सोमय्यावर विश्वास आहे. ज्या लोकांचे पैसे लुटले जातात, ज्या शेतकऱ्यांना लुटले जातात, ते माझ्याकडे येऊन सगळी माहिती देतात, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.