राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी लॉटरी, मिळणार वर्षाला ६ हजार रुपये

पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण 12 हजार रूपये मिळणार आहेत.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी लॉटरी, मिळणार वर्षाला ६ हजार रुपये

मुंबई - राज्य सरकारचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रूपये इतका वार्षिक निधी मिळणार आहे. राज्य सरकारतर्फे ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यात कांद्याचे भाव घसरल्याने आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागले होते. दरम्यान, आज राज्य सरकाने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही घोषणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण 12 हजार रूपये मिळणार आहेत.

केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली होती. शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करत असते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान येतो. यासोबतच तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे वार्षिक बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतके आहे.