प्रकल्पांना थोर महापुरुषांची नावे दिली पाहिजेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्रकल्पांना थोर महापुरुषांची नावे दिली पाहिजेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. महापालिकेच्या प्रकल्पांना प्रत्येकाच्या घरातील व्यक्तींची नावे भावनिक दिली जातात. त्याऐवजी प्रकल्पांना थोर महापुरुषांची नावे दिली पाहिजेत. त्याबाबत नगरविकास खात्यातूनच काही आदेश काढावेत का, याचा विचार करत आहे. किंवा नावांबाबत मंत्रालयातून परवानगी घ्यायची असे काय करता येते का, याचा विचार आपल्याला करावा लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे.

नुकतीच पुण्यात अशी दोन प्रकरणे घडली आहेत की ज्यामुळे या विषयावर आता चर्चा होऊ लागली आहे. आता अजित पवार यांनीही या विषयाला वाचा फोडली आहे. त्यांचे वक्तव्य या पार्श्वभूमीवर महत्वाचे मानले जात आहे.

यातील एक प्रकरण आहे सॅलिसबरी पार्कचे. सॅलिसबरी पार्क परिसरातील महापालिका उद्यानाला भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दिले. प्रशासकीय राजवट सुरु होण्याच्या आदल्या रात्री हा बदल करण्यात आला. या नामांतराला स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून नागरिक याबाबत आंदोलन करीत आहेत. तसेच महापालिका प्रशासन, शहर विकास विभाग, राज्याचे विरोधी पक्षनेते, सामाजिक कार्यकर्त्यांसोबत सॅलिसबरी पार्क मधील नागरिक पत्रव्यवहार करीत आहेत.

दुसरे प्रकरण आहे महात्मा फुले वाड्याचे. 24 मे रोजी ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपाच्या माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हरीहर यांच्या सासू ‘कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर’ यांच्या नावाचा फलक लावण्यात आला.

अशा घटना महाराष्ट्रात सर्रास घडत आहेत. सन 2000 साली सर्व सार्वजनिक उद्यानांना, राष्ट्रीय व्यक्ती, मोठे पर्यावरण तज्ज्ञ यांचीच नावे देण्याचा जीआर काढण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक व्यक्तींची नावे उद्यानाला दिली जात नव्हती. मात्र आता त्या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे.