तंत्रज्ञानाच्या अति आहारी गेल्याने आनंदाच्या वाटा बंद - कळमकर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तंत्रज्ञानाच्या अति आहारी गेल्याने आनंदाच्या वाटा बंद - कळमकर

पिंपरी - टीव्ही, मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाच्या अति आहारी गेल्यामुळे आपल्या आनंदाच्या वाटा बंद झाल्या आहे, असे प्रतिपादन विनोदी साहित्यिक संजय कळमकर यांनी निगडी येथे केले. प्राधिकरणातील जयहिंद मित्र मंडळ ट्रस्ट आणि जय बजरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयहिंद व्याख्यानमालेत "आनंदाच्या वाटा" या विषयावर ते बोलत होते. 

यावेळी हभप किसन महाराज चौधरी, व्याख्यानमाला समन्वयक समितीचे प्रमुख राजाभाऊ गोलांडे, उद्योजक अतुल इनामदार, मंडळाचे अध्यक्ष राजेश फलके, कार्याध्यक्ष दयाराम क्षीरसागर, उपाध्यक्ष विजय भोसले आदी उपस्थित होते.

कळमकर पुढे म्हणाले की, पूर्वी मनोरंजनाची साधने कमी होती. एक रेडिओ संपूर्ण गावाचे मनोरंजन करायचा. पूर्वी गावात नाटके व्हायची यातही लोक आनंदी राहायचे. नंतर टीव्हीने जागा घेतली. रंगीत टीव्ही आल्यानंतर आपले जीवनमान रंगीबेरंगी झाले. काही कालांतराने मोबाईल आले.

मोबाईलमुळे आपल्यामधील संवाद लोप पावत चालला आहे. पैसा संपत्ती, सुबत्ता आली मात्र समाधान नाही. महिला तर मालिका पाहण्यात दंग असतात. आपल्या संवेदना मेल्या. सर्व काही असूनही आपल्याला आनंदाच्या वाटा शोधावे लागतात. पूर्वी राजकारणी मंडळीदेखील टीका केली तरी त्यातही आनंद शोधायचे. आतातर एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. पूर्वी फक्त विद्वान मंडळी व्यक्त होत होती आता मात्र ज्यांच्याकडे मोबाईल ते समाज माध्यमातून टीका टिप्पणी करतात.

आपला आनंद आपणच हिरवून बसलो आहोत. मन आनंदित ठेवल्यास जग आनंदी दिसेल. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिने पहावे. दुसऱ्याच्या दु:खात आनंद हा अल्पकाळ टिकतो. कलाकृती, साहित्य, भाषणे यामुळे दु:ख पचविण्यास ताकद देईल व आनंदाच्या वाटेकडे घेवून जाईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बेताळे यांनी तर आभार विजय भोसले यांनी मानले.