मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून राजेंचे आमरण उपोषण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून राजेंचे आमरण उपोषण

मुंबई, दि. 14 - मराठा आरक्षणासाठी येत्या 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषण करणार असल्य़ाचे संभाजी राजे यांनी जाहीर केले आहे. हे उपोषण मुंबईतील आझाद मैदानात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे मी अतिशय निराश झालो असून, आता माझ्यापुढे आमरण उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे. मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या.  आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतु काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. त्यानंतर खूप दिवसांनंतर याचीका दाखल केली गेली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतु काहीच केलं गेलं नसल्याचंही संभाजीराजे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचं असेल तर अपवादात्मक परिस्थिती असायला हवी. अनेकजण म्हणतात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला हवं, परंतु माझं म्हणणं आहे की टिकणारं आरक्षण द्या. मी सर्व नेत्यांच्या दारी गेलो. मूक आंदोलन कोल्हापुरात केलं परंतू, काहीच साध्य झालं नाही. मोजून पाच ते सहा मागण्या आहेत पण त्याही मान्य होत नाहीत. त्यामुळेच आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचे ठरविले आहे.