महाराष्ट्र

चढ्या दरामुळे आंबा खरेदीकडे ग्राहकांची पाठ

मागणी नसल्याने उत्पादकांसह व्यापारीही अडचणीत

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त उत्थान फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून उत्थान फाउंडेशन, पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.  फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष हरप्रितसिंग यांच्या अध्यक्षतेखाली संकल्प पुष्पमाला समिती, पिंपरी चिंचवड शहर, यांच्या तर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांसाठी वही, पुस्तके, पेन अशा शालेय उपयोगी वस्तूंचे संकलन करून महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात वाटप केले जाते. त्याच अनुषंगाने हरप्रितसिंग यांच्या अध्यक्षतेखाली उत्थान फाउंडेशनतर्फे आज (दि. १४) ५० डझन वह्या व ५०० पेन चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी संकल्प पुष्पमाला समिती, पिंपरी चिंचवड शहर चे समन्वयक रमेश जाधव, उत्थान फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष हरप्रीत सिंग, पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र राज्य एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे आणि उत्थान फाउंडेशनचे कार्यकर्ते जावेद शेख,अतुल आल्हाट, अमोल सूर्यवंशी, मंगेश शेटे, सागर अवसरे, सुरज पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके न देताच ठेकेदारांवर पिंपरी-चिंचवड महापालिका मेहरबान

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्याप वह्या-पुस्तके वाटप करण्यात आलेले नाहीत.

गॅसपाईपलाईनचे टेंडर राजकीय हस्तक्षेपामुळे अडचणीत

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नविन भोसरी रुग्णालय, जिजामाता, आकुर्डी आणि थेरगाव रुग्णालयासाठी द्रव ऑक्सीजनसह मेडिकल गॅस पाईपलाईन बसविणेच्या कामाची ४ जानेवारी रोजी २६ कोटी ६१ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. राज्य शासनाच्या महा ई टेंडर या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेचा कालावधी सोमवारी (दि.२५) संपुष्टात आला आहे. यासाठी देशपातळीवर स्पर्धा होऊन सहाजणांनी निविदा सादर केली आहे. मात्र या कालावधीत सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांच्या बगलबच्यांना निविदा सादर करणे शक्य झाले नाही. यामुळे आता या निविदेला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी काहीजण करत आहेत.

मुंबईकरानो, आजही लसीकरण सुरू; BMCनं केलं आवाहन

"मुंबईकरांनो, शहराच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे याची आम्हाला जाणीव"