येत्या २० तारखेपर्यंत रोज राजीनामे येतील ! राजीनाम्यानंतर धरमसिंह सैनींचा योगींना इशारा !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसांपासून राजकीय भूकंप होऊ लागले आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील तीन मंत्री आणि पाच आमदारांनी पदाचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे यातले बहुतेक मंत्री आणि आमदार ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. यातले बहुतेकजण समाजवादी पक्षात गेले असून याचा भाजपाला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. आज सकाळी मुकेश वर्मा यांनी देखील भाजपा सोडून सपाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत.
सैनी यांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याचं पत्र व्हायरल होत आहे. “ज्या अपेक्षा ठेवून दलितांनी, मागासवर्गाने, शेतकऱ्यांनी, सुशिक्षितांनी, छोट्या-मध्यम व्यापाऱ्यांनी भाजपाला बहुमत दिलं होतं, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मी राजीनामा देत आहे”, असं सैनींनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, एकामागून एक मंत्री राजीनामा देत असताना त्यांच्यासोबत आमदार देखील पक्ष सोडून जात असल्यामुळे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वगुणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.