आधी 'त्या' 700 शेतकरी कुटुंबीयांची माफी मग मोदीसाहेब !- संजय राऊत ; महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचेही पंतप्रधानांवर टीकास्त्र 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आधी 'त्या' 700 शेतकरी कुटुंबीयांची माफी मग मोदीसाहेब !- संजय राऊत ; महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचेही पंतप्रधानांवर टीकास्त्र 
मुंबई - 
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या 700 शेतकऱ्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुबांसाठी आर्थिक मदत जाहीर करावी. तसंच लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवर सर्व खटले मागे घ्यावेत. जय जवान, जय किसान,’ असं ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तर मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही, असं टीकास्त्र काँग्रेस नेते आणि महसूल मंत्रीबाळासाहेब थोरात यांनी सोडलं. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत, असं सांगत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन मोदींनी केलं. या अनुषंगाने राऊत यांनी वरील ट्विट केले. 
दरम्यान, हा गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांच्या लढ्याचा मोठा विजय आहे. पण आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाराची जबाबदारी भाजपा सरकारला टाळता येणार नाही. त्यांनी प्रायश्चित घेऊन माफी मागावी’, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.  केंद्र सरकारने या शेतकरी आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना खलिस्तानी, नक्षलवादी, देशद्रोही म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रक्त गोठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविले गेले. शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू या आंदोलनादरम्यान झाला. काही शेतकरी बांधवांना गाडीखाली चिरडून मारले गेले, त्याची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही आणि अन्नदात्याची माफी मागावी लागेल, असे थोरात म्हणाले. 

दरम्यान, माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रचंड दबावापुढे न झुकता शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती की देशातील शेतकऱ्यांच्या भावनाही आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिल्या आणि अखेर आज पंतप्रधानांना तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले.