पिंपरी-चिंचवड शहराकरिता, पुणे GPO पोस्ट ऑफिस प्रमाणे नवीन स्वतंत्र टपाल कार्यालय सुरु करावे – नाना काटे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी-चिंचवड शहराकरिता, पुणे GPO पोस्ट ऑफिस प्रमाणे नवीन स्वतंत्र टपाल कार्यालय सुरु करावे – नाना काटे

पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने, गतीने होणारा विकास, शहराची वाढणारी लोकवस्ती, शहराची वाढणारी हद्द,तसेच पिंपरी चिंचवड शहरालागत असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या पाहता पिंपरी चिंचवड शहरातील झोन पोस्ट ऑफिस अपुरे पडत असून, शहरातील व परिसरातील नागरिकांना टपाल खात्याची सेवा प्रभावीपणे पुरविता येत नाही किंबहुना त्या नागरिकांपर्यंत पोहचत नाहीत, याकरिता पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र टपाल विभाग होणे आवश्यक आहे.   

टपाल खात्याच्या विशिष्ट सेवा, योजनाकरिता तसेच विविध सेवा संबंधीत तक्रारींचा पाठपुरावा करण्याकरिता शहरातील नागरिकांना पुणे शहरातील मुख्य टपाल कार्यालयशी ( GPO ) तसेच विभागीय टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा लागत आहे जे की पिंपरी चिंचवड शहरापासून खूप दूर आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेचा, पैशाचा अपव्यय होतो व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांची होणारी गैरसोय पाहता, मी गेली अनेक वर्ष वेळोवेळी पत्रव्यवहार, ईमेल, करून पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र टपाल विभागाची मागणी संचार मंत्रालयाच्या डाक विभागाकडे करीत आहे. जर पिंपरी चिंचवड शहरात नवीन स्वतंत्र टपाल विभागाची निर्मिती केल्यास, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना केंद्र सरकारच्या टपाल खात्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ मिळण्यास येणारे प्रशासकीय अडथळे दूर होतील. तसेच नागरीकांच्या वेळेचा आणि पैश्यांचा अपव्यय टाळता येऊ शकतो.