चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची केली महात्मा फुलेंशी तुलना

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची केली महात्मा फुलेंशी तुलना

पुणे – उर्फी जावेद हिच्या कपड्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या असून यामुळे राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे हा नवा वाद निर्माण झाला आहे.

पुण्यात बोलताना चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आली आहे. त्या म्हणाल्या, “तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे”.

पुण्यातील हेमंत रासने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाची राळ उडाली होती.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तुमच्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही ही विधानं करत आहात पण त्यात महापुरुषांना मध्ये ओढू नका असं मिटकरी म्हणाले.

चित्रा वाघ ह्या रविवारी पुण्यात हळदी-कुंकाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी वरील वादग्रस्त विधान केले. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे. काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. आज आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र आजही सुरू आहे. चंद्रकांत दादा सारखे जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते, असे शेवटी चित्रा वाघ म्हणाल्या.