संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे केले लोकार्पण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे केले लोकार्पण
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे केले लोकार्पण
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे केले लोकार्पण
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे केले लोकार्पण
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे केले लोकार्पण
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे केले लोकार्पण

देहू, (प्रबोधन न्यूज) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते देहूतील संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोदींनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, विठ्ठल-रुख्मिणी यांचे दर्शन घेतले. लोकार्पण सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.

तुकोबारायांचा अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्यानंतर नदीकाठच्या दगडी शिळेवर बसून तुकोबारायांनी १३ दिवस अनुष्ठान केले. ही शिळा मुख्य देऊळवाड्यात आहे. या शिळा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. नव्याने बांधलेले शिळा मंदिर संपूर्ण दगडात आहे. मंदिराला दोन सुवर्ण कळस आहेत. मुख्य गाभारा, मंडप यासह मंदिराच्या चार कोपऱ्यावर चार कळस आहेत. तुकोबारायांची नवीन मूर्ती बनविण्यात आली आहे.

यादव साम्राज्य संपल्यानंतर संपूर्ण समाज छिन्नविछिन्न झाला होता. कर्मकांड, बुवाबाजीचे स्तोम माजले होते. शोषण सुरू होते. त्यावेळी भागवत धर्माची पताका हाती घेऊन संतांनी महाराष्ट्र धर्माला जागृत केले. ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला. त्याचा कळस तुकाराम महाराज झाले. तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा दूर करून सश्रद्ध समाज तयार करण्याचे काम केले. त्यांच्या शब्दांचे धन कोणीही बुडवू शकले नाही. इंद्रायणीने त्यांचे शब्द पुन्हा वर केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. जे का रंजले गांजले, या धर्मानुसारच पंतप्रधान करत आहेत. पंतप्रधान आपले वारकरी आहेत. वारकऱ्यात सारेच सेवक असतात. आपले पंतप्रधान प्रधानसेवक आहेत. संपूर्ण जग आपले आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. तेच मानून संपूर्ण जगाला लस पोहचवण्याचे काम मोदीजींनी केले, असे फडणवीस म्हणाले.