राष्ट्रवादी पक्षावर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर ! 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रवादी पक्षावर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर ! 

पुणे -

देवेंद्र फडणवीस कदाचित एक गोष्ट सांगायला विसरले असतील की, त्यांच्याच केंद्र सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण दिलं होतं. ते माध्यमांना सांगायला ते विसरले असतील, असं सडेतोड प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना दिलं. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल टीका केली होती. गोव्यात शरद पवार भाजपाला आव्हान देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “हे पाहा विरोधकांचं म्हटलं तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, ‘पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा… ’, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही.” यावर सुळे यांनी वरील उत्तर दिलं. 

भाजपाकडून महाविकास आघाडी सरकाच्या कारभारावर टीका केली जात आहे, यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “विरोधक बोलायचं काम करत रहावं, मुख्यमंत्री काम करत राहातील. मात्र कोविडच्या काळातील कामगरीबद्दल परदेशांसह केंद्र सरकारने देखील महाराष्ट्राचं कौतुक केलेलं आहे.”

शाळांच्या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, टास्क फोर्सचं म्हणणं आणि पालक आणि शिक्षकांची माहिती घेऊन, यातून काहीतरी सुवर्णमध्य साधून आपल्याला टप्प्याटप्याने जर शाळा सुरू करता आल्या, मला वाटतं मुलांच्या शिक्षणाला खूप मदतीचा हात होईल. कारण, ऑनलाईनच्याही शिक्षणात मुलांचं खूप नुकसान केवळ आपल्या राज्यात, देशात नाही तर जगभरात झालेलं आहे. ते कुठेतरी भरून काढण्याची गरज आहे. पालक शिक्षक, स्थानिक अधिकारी या सगळ्यांनी मिळून सर्व परिस्थितीचा अभ्यास करून शाळेबाबत निर्णय घ्यावा असं मला वाटतं, असं त्या म्हणाल्या.