पवना धरण पूर्णपणे भरले तरी शहरवासीयांवर कुत्रिम पाणी टंचाई कशासाठी ? - नाना काटे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पवना धरण पूर्णपणे भरले तरी शहरवासीयांवर कुत्रिम पाणी टंचाई कशासाठी ? - नाना काटे

  पिंपरी  , (प्रबोधन न्यूज )   -  पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण पूर्णपणे भरले तरी शहरवासीयांवर कुत्रिम पाणी टंचाई कशासाठी ? दिवसाआड पाणीपुरवठा हा निर्णय रद्द करून दररोज पाणीपुरवठा सुरु करावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते 

 पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात चांगल्या व मुबलक योग्य प्रमाणात पाऊस पडलेला असल्याने  ही  आपल्यासाठी आनंदाची बाब असताना देखील शहरवासीयांवर दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या नावाखाली कुत्रिम पाणी टंचाईची टांगती तलवार कशासाठी ?, कटिबद्ध जनहिताय हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य आहे, त्यानुसार शहरवासियांना योग्य सुविधा देणे व तसेच  समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. 

परंतु गेल्या वर्षभरापासून प्रशासन व पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी, नियोजन शून्य व भोंगळ कारभारामुळे धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असताना देखील शहरातील टॅकर लॉबीला फायदा व्हावा म्हणून या हेतूने महापालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणीचे कारण देत दिवसाआड पाणीपुरवठा हा पाणी कापतीचा निर्णय घेवून शहरात कुत्रिम टंचाई निर्माण केलेली आहे, याचा शहरातील नागरिकांना नाहक त्रास होत असून शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हि खूप गंभीर बाब असून, म्हणून याचा विचार करता मा. आयुक्त तथा प्रशासक साहेब त्वरित दिवसाआड पाणीपुरवठा हा निर्णय रद्द करून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात दररोज व पुरेशा दाबाने योग्य  प्रमाणत पाणी पुरवठा करावा असे आदेश संबंधित पाणीपुरवठा विभागाला देण्यात यावे व शहरवासीयांवर गेल्या वर्षभरापासून प्रशासनाने लावलेले कुत्रिम पाणी टंचाईचे संकट दूर करावे