पाचव्या पत्नीने पतीचे गुप्तांग कुऱ्हाडीने कापून रस्त्यावर फेकून दिला मृतदेह

बीरेंद्र गुर्जर असं मृताचं नाव आहे. त्याने पाच लग्नं केली होती आणि त्याचा खून करणारी त्याची पाचवी पत्नी होती. तिचं नाव कांचन गुर्जर आहे.

पाचव्या पत्नीने पतीचे गुप्तांग कुऱ्हाडीने कापून रस्त्यावर फेकून दिला मृतदेह

उर्ती (मध्य प्रदेश) - सिंगरौली जिल्ह्यातील उरती गावात एका व्यक्तीच्या हत्येचे प्रकरण पोलिसांनी उघड केले. पत्नीनेच पतीची हत्या केली होती. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. गावातील बिरेंद्र गुर्जर यांचा मृतदेह २१ फेब्रुवारी रोजी सापडला होता. मृताच्या गळ्यावर व गुप्तांगावर जखमेच्या खुणा होत्या.

याबद्दल मिळालेली माहिती अशी की, सिंगरौली इथं एका महिलेनं पतीवर कुऱ्हाडीने वार करून त्याचं गुप्तांग कापलं आणि नंतर त्याची हत्या केली. बीरेंद्र गुर्जर असं मृताचं नाव आहे. त्याने पाच लग्नं केली होती आणि त्याचा खून करणारी त्याची पाचवी पत्नी होती. तिचं नाव कांचन गुर्जर आहे.

बीरेंद्रचा मृतदेह 21 फेब्रुवारी रोजी सापडला होता. मृताच्या गळ्यावर आणि गुप्तांगावर जखमा होत्या, असं पोलिसांनी सांगितलं. पतीची हत्या करणाऱ्या कांचनने स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण पांडे यांनी सांगितलं.

तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते. पोलिसांनी मृताच्या जवळच्या नातेवाईकांसह संशयित प्रत्येकाची चौकशी करून कसून तपास केला. यादरम्यान मृताच्या पत्नीचीही पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची कडक चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

आरोपी पत्नी कांचन गुर्जरने पोलीसांना सांगितले की, पती बीरेंद्रला दारूचे व्यसन होते. या व्यसनातून तो तिचा छळ करून तिच्यावर अत्याचार करायचा. याच छळाला कंटाळून पतीच्या हत्येचा कट रचला होता. 21 फेब्रुवारीच्या रात्री बीरेंद्रच्या जेवणात 20 झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. या गोळ्यांमुळे त्याला खूप झोप आली आणि यावेळी तिने त्याची हत्या केली.

कांचनने गाढ झोपेत असलेल्या पतीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि त्यानंतर धारधार शस्त्राने पत्नीच्या गुप्तांगावर (प्रायव्हेट पार्ट) वार करत त्याची हत्या केली. बीरेंद्रची हत्या केल्यानंतर तिने मृतदेह कपड्यात गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी कांचने त्याचे कपडे आणि चप्पल जाळून टाकली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन ही बीरेंद्रची पाचवी पत्नी होती. याआधी चार बायकांनी बीरेंद्रच्या छळाला कंटाळून त्याला सोडून दिले होते. कांचन सोबतही बीरेंद्र तसाच छळ करत होता. त्यामुळे या छळाला कंटाळून तिने बीरेंद्रची हत्या केली. बीरेंद्रच्या हत्येप्रकरणी पोलीसांनी कांचनला ताब्यात घेतले असून, तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशच्या सिंगरोली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.