मोदी स्वत:ला राजा समजू लागलेत, भाजपचा माज उतरवा', नाना पटोलेंनी केले आवाहन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मोदी स्वत:ला राजा समजू लागलेत, भाजपचा माज उतरवा', नाना पटोलेंनी केले आवाहन

चिंचवड (प्रबोधन न्यूज) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची आज संयुक्त सभा झाली. यावेळी नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर हल्लाबोल केला. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागले आहेत तर भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे, हा सत्तेचा माज कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उतरवून भाजपाला त्यांची जागा दाखवून द्या, असं आवाहन त्यांनी आज केलं.

पुण्यातील चिंचवड व कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून दोन्ही जागा भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी चिंचवड इथं आज आघाडीची संयुक्त सभा झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली.

'महाराष्ट्रानं देशात करोना पसरवला असा खोटा आरोप करून मोदींनी संसदेतच महाराष्ट्राची बदनामी केली. करोना काळात भाजपचं सरकार झोपलं होतं तेव्हा महाविकास आघाडी सरकारनंच लोकांना आधार दिला, मदत पोहचवली. याउलट भाजपचे लोक महाराष्ट्राची, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी करत राहिले, असं पटोले म्हणाले.

 'पिंपरी चिंचवडच्या विकासात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान मोठं आहे. आघाडी सरकार असताना या भागात विकासाची कामं केली. मविआ सरकारनंही हा विकास पुढे सुरू ठेवला होता पण तथाकथित महाशक्तीच्या मदतीनं मविआचं सरकार पाडलं गेलं, बेईमानी करून सरकार पाडलं. आता भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात उभे राहण्याची संधी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतांची तलवार दिली आहे तिचा आता वापर करा आणि मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर व नाना काटे यांना बहुमताने विजयी करा, असं आवाहन पटोले यांनी केलं.

'राहुल गांधी यांच्या बदनामीसाठी भाजप व त्यांचा आयटी सेल कोट्यवधी रुपये खर्च करतो आहे. पंतप्रधान झाल्यापासून मोदी हे फक्त देशाची संपत्ती विकून देश चालवत आहेत. संविधान व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहेत. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटत आहेत, छोटे व्यापारी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.