विद्येचे माहेरघर अशी ओळख पुसली जाऊन गुन्हेगारांचे पुणे अशी नवीन ओळख – प्रवीण दरेकर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विद्येचे माहेरघर अशी ओळख पुसली जाऊन गुन्हेगारांचे पुणे अशी नवीन ओळख – प्रवीण दरेकर

पुणे, दि. २९ एप्रिल - एकेकाळी सुसंस्कृत, शांत आणि सुशिक्षित म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुन्हेगारीचे केंद्र बनत आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. राज्यातील एकूण गुन्ह्यांमध्ये पुण्याचा वाटा ११ टक्के आहे. ही खेदाची बाब असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

दरेकर यांनी वाघोली गणेशनगर येथे प्रभु श्री राम उद्यान आणि संदीप सातव यांच्या क्विक रिस्पॉन्स टीम नावाच्या वाहनपूर्व सुविधेचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार बापू पठारे, प्रदीप कांडा, गणेश भेगडे, बाबा राजे जाधवराव, किरण दगडे, रोहिदास उंद्रे, संदीप सातव, दादा सातव, गणेश कुटे, वाघोली व हवेली परिसरातील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

दरेकर पुढे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री पुण्याचे आहेत, उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, विकासकामे होत नाहीत. आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे. जो काही भ्रष्टाचार होत आहे. आम्ही त्याचा पर्दाफाश सुरू केला आहे. संदीप सातव यांनी सुरू केलेल्या मोफत सुविधेचे आणि वाहन क्विक रिस्पॉन्स टीमचे त्यांनी कौतुक केले.

वाघोलीत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. वाघोलीला भामा आस्केड योजनेचे पाणी मिळावे. त्यासाठी संदीप चळवळ सुरू करणार आहे. त्यासाठी मी नक्की येईन, अशी ग्वाही दिली. भाजप सरकारवर टीका करताना आमदार राहुल कुल म्हणाले की, मुख्यमंत्री दोन वर्षांनी मंत्रालयात येत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आमदारांकडून घोषणा दिन साजरा केला जाईल.