देश - विदेश

मजुरांचा तांडा पुन्हा गावाकडे..

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या करोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे सरकारला केली विनंती; म्हणाले…

करोना परिस्थितीमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याचं कळकळीचं आवाहन करतानाच लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन होण्याच्या भीतीने लोकांच्या मनात धस्स झालं असून, लॉकडाउन न करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला विनंती केली आहे.

लग्न समारंभात घुसून नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रामा तलांडी (३७) यांची शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास १० ते १५ नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली. अचानक करण्यात आलेल्या गोळीबारात तलांडी यांचा जागीच मृत्यू झाला.