परमबीर यांनी 30 दिवसांत हजर राहावे ! घरासमोर लागला कोर्टाचा आदेश 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

परमबीर यांनी 30 दिवसांत हजर राहावे ! घरासमोर लागला कोर्टाचा आदेश 
मुंबई - 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जुहू येथील घरासमोर कोर्टाचा आदेश लावण्यात आला आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 30 दिवसांच्या आत परमबीर सिंह कोर्टासमोर हजर राहिले नाही तर, त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, अशी सूचनाही या आदेशात दिली आहे. परमबीर सिंह यांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने फरार घोषित केल्यानंतर आता कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. 

बुधवारी म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंह यांना फरार म्हणून घोषित केलं. त्यांना मुंबई पोलिसांनी गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवले होते. मात्र या समन्सनंतर ते हजर झाले नाहीत. शेवटी त्यांना न्यायालयाने फरार म्हणून घोषित केले. आता न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. परमबीर यांच्या जुहू येथील घरासमोर कोर्टाचा आदेश लावण्यात आलाय. त्यामध्ये सिंह फरार असल्याचं नमूद करण्यात आले. तसेच 30 दिवसांच्या आत कोर्टासमोर हजर न झाल्यास संपत्ती जप्त तसेच इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना सोमवारी अटकेपासून संरक्षण दिले आहे. तर दुसरीकडे सिंह यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा त्यांच्या विकालने केला आहे. परमबीर सिंह देशातच आहेत. ते कुठेही गेलेली नाहीत. ते पळूनही जाणार नाहीत. मात्र त्यांच्या जीवाला धोका आहे, असं वकिलाने सांगितलंय. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप केल्यामुळेच माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत, असा दावा सिंह यांनी केला आहे.