आपल्याला जे नको ते प्राप्त का होते याचा विचार करून सद्गुरुला शरण जा - सदगुरु शिवकुमार महास्वामीजी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आपल्याला जे नको ते प्राप्त का होते याचा विचार करून सद्गुरुला शरण जा  - सदगुरु शिवकुमार महास्वामीजी

पिंपरी - आपल्याला जे नको ते प्राप्त का होते याचा विचार करून सद्गुरुला शरण गेले पाहिजे असे प्रतिपादन प. पू. सद्गुरू शिवकुमार महास्वामीजी, बिदर यांनी येथे केले. दि. २८ जानेवारीपासून भोसरी भोसरी येथे प. पू. सदगुरू शिवकुमार महास्वामीजी यांचा अध्यात्मिक सोहळा गुरुदर्शन व प्रवचन सोहळ्याची सांगता बुधवारी झाली. भोसरीतील  कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे प्रवचनापूर्वी भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

यानंतर "मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान" या विषयावर प. पू. सदगुरू शिवकुमार महास्वामीजी यांचे प्रवचन झाले. यावेळी ते म्हणाले की, जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येकजण सुखासाठी प्रयत्न करतो. दुःख कोणालाही नको आहे. प्रत्येकाला सुखच हवे आहे. पण सुखाची इच्छा करताना आपल्या वाट्याला दुःख का येते याचा विचार आपण करत नाही.

यावेळी श्री स्वरूपानंद सरस्वती स्वामीजी म्हणाले की, साधकाच्या जीवनात अध्यात्म मार्गाचे अनुसरण करताना सद्गुरूंच्या सानिध्याशिवाय साधकाचा उद्धार होत नाही. साधना पूर्ण करून पूर्णत्वास जायचे असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. श्रद्धा हवी तसेच ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ही अवस्था प्राप्त करण्यासाठी साधना हवी. जन्मोजन्मी परमेश्वराच्या पायाशी समर्पण  केले पाहिजे त्याचा अनुग्रह म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती होय असे श्री स्वरूपानंद सरस्वती स्वामीजी म्हणाले.

वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी म्हणाले की, अनेक देश आर्थिक सत्ता म्हणून नको त्या गोष्टीत श्रीमंत आहेत, मात्र भारत देशा इतकी आध्यात्मिक श्रीमंती कुठल्या देशांमध्ये नाही. नामदेवरायांच्या हातून पांडुरंग जेवण करायचा. प्रत्येक दगडात प्रत्येक जीवात परमेश्वर पाहण्याची शक्ती सद्गुरु देतात. सद्गुरु एक सिद्धांत व एक तत्व आहे. प्रभू रामचंद्र वशिष्ठांकडे जातात, कृष्ण ही संदिपान ऋषीकडे जातो, थोर गुरुपरंपरा असलेला आपला देश आहे. गुरुला वयाची भाषेची मर्यादा नाही असे ते म्हणाले.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, आध्यात्मिक विचार आपल्याला चांगल्या दिशेने घेऊन जातात. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन श्री सदगुरू सिद्धारूढ अध्यात्मिक समिती, पुणेचे परमपूज्य शंकरानंद स्वामीजी संस्थापक तसेच अध्यक्ष अमरनाथ माना, सचिव रमेश गंताले, रमेश कोहल्ली, शिवपुत्र संतपुरे, सूर्यकांत मुरुड, रवींद्र चांगलेरा, अण्णासाहेब बिरादार, चंद्रशेखर गाणगेर, वीरेंद्र काळे, संतोष बिराजदार, भक्ती धनुरे यांनी केले होते.