आकाश वाणीच हे पुणे केंद्र आहे ........ आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग १९ जूनपासून होणार बंद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आकाश  वाणीच हे पुणे केंद्र आहे ........  आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग १९ जूनपासून होणार बंद

    पुणे , (प्रबोधन न्यूज )  -  आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. या संबंधीचा लेखी आदेश पाठविण्यात आला असून १९ जूनपासून पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणी वरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र औरंगाबाद वृत्त विभागाकडे सोपवण्यात आले आहे.

आकाशवाणीवरील पुणे प्रादेशिक वृत्त विभागाकडून सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी होणाऱ्या तसेच एफएम वाहिनीवरील सकाळी ८, १०. ५८ आणि ११.५८ तसेच सायंकाळी ६ च्याही बातम्या आता बंद होणार आहेत. तसेच सकाळी ८. ३० वाजताचे राष्ट्रीय बातम्याही बंद होणार आहेत. या बातम्या आता औरंगाबाद केंद्राहून दिल्या जाण्याची शक्यता आहे.

परंतु, पुण्यातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार असल्यामुळे या बातम्या तेथे पोचणार कशा, पुण्यातील घडामोडींची दखल औरंगाबादहून कशी घेतली जाणार या बाबत सध्या तरी अनिश्चितता आहे.

देशात आकाशवाणीच्या पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते आहेत. सुमारे २४ लाख श्रोते नियमिपतणे कार्यक्रम ऐकतात. पुण्यातील केंद्राची स्थापना १९५३ झाली असून येथून गेल्या ४० वर्षांपासून बातम्या प्रसारीत होत होत्या.

प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रम देखील आता बंद होणार आहेत. या निर्णयामागे कारण देताना प्रसार भारतीने या विभागांचे प्रमुख म्हणून काम करण्यासाठी भारतीय माहिती सेवेतील पूर्णवेळ अधिकारी दीर्घकाळापासून उपलब्ध नसल्याने पुणे वृत्त विभागाची बातमीपत्रे औरंगाबादला सोपवण्यात येत असल्याचे याबाबच्या आदेशात म्हटले आहे.

पुणे वृत्त विभागात भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्यांची दोन पदे होती, ती अन्य केंद्रांवर हलविण्यात आली. कालांतराने हा विभाग बंद करुन इथली बातमीपत्रे अन्यत्र हलवण्याचा निर्णयही पूर्वीच झाला होता.

परंतु त्यावेळी या निर्णयाला सर्वच स्तरातून जोरदार विरोध झाल्याने तो निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. पण आता या ताज्या आदेशानुसार आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग कायमचा बंद होणार आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टिने देखील या विभागाची बातमीपत्रे महत्वाची ठरणार आहेत परंतु तो बंदच झाला तर श्रोत्यांची देखील मोठी गैरसोय होणार आहे. शिवाय पुण्यामध्ये दर दिवसा आड केंद्रीय मंत्र्यांचे दौरे होत असतात. जी-20 परिषदेसारखे महत्वाचे कार्यक्रम सातत्याने होत असतात.

त्यांचे वार्तांकन करुन ते अन्य वृत्त विभागांना तसेच दिल्लीला पाठवण्याचे महत्वाचे काम पुणे वृत्त विभागाद्वारे केले जाते. या निर्णयानंतर पुण्याच्या महत्वाच्या बातम्या कशा पद्धतीने प्रसारित होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या हा विभाग एक भारतीय माहिती सेवेचा अधिकारी (प्रभारी), एक वृत्त निवेदक आणि एक हंगामी वृत्त संपादक याशिवाय हंगामी वार्ताहर. इतक्याच मनुष्यबळावर कार्यक्षमपणे चालू आहे. परंतु, आता तोही बंद होणार आहे.