शिंदे फडणवीसांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागावी:- संभाजी ब्रिगेड

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शिंदे फडणवीसांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागावी:- संभाजी ब्रिगेड

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काही दोन दिवसापूर्वी उत्साहात पार पडला. दरम्यान पालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीमार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. गेल्यावर्षी प्रस्थानावेळी मंदिरात १७ हजार वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे यावर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली. प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात राजकीय क्षेत्रातील काही लोकं मंदिरात उपस्थित होती आणि म्हणून अनेक वर्षाची परंपरा असलेल्या वारीच्या परंपरेला बाजूला ठेऊन गर्दी टाळण्यासाठी दिंडीतील ठराविक वारकऱ्यांनाच आत घेण्याचं प्रशासनाने ठरवले होते. फक्त्त राजकीय लोकांच्या सुरक्षेसाठी शेकडो वर्षे वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मंदिरा बाहेर रोखून ठेवण्यात आलं असल्यामुळे काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांकडून वारकऱ्यांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. यात अनेक तरुण तसेच वृद्ध वारकरी ही जखमी झालेले आज दिसून येत आहेत.
 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून वारकरी परंपरा चालू आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या कार्यकाळामध्ये वारीला संरक्षण देण्याचे काम केले होते संत नामदेव, ज्ञानोबा, तुकोबा यांनी सुरू केलेल्या वारकरी परंपरेला  प्रथमच गालबोट लावण्याचे काम या शिंदे फडणवीस सरकारने केलेले आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे आळंदीच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही वारकऱ्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा भविष्यात महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदर निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे. पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे,शहर कार्याध्यक्ष संजय जाधव, सचिन मंगेश चव्हाण, संघटक अभिषेक गायकवाड उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सहसचिव सुभाष जाधव यांच्या सह्या आहेत.