फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे दूरदृष्टीचा अभाव व अवास्तव – अजित पवार
अजित पवार म्हणाले की, “हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकारचा चुनावी जुमला आहे.”
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई - राज्यातल्या नव्या सरकारने म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारने आज त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खरपूस टीका केली आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधीमंडळाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया विचारली असता, पवार म्हणाले की, “हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकारचा चुनावी जुमला आहे.”
अजित पवार म्हणाले की, “अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आपण पाहिला. खरंतर हा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकराचा चुनावी जुमला आहे. यात आपल्याला दूरदृष्टीचा आभाव जाणवेल. तसेच वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे. या राज्यात अलिकडच्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ९ वेळा आणि मी स्वतः ७ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. माझ्या मते स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे.”
अजित पवार म्हणाले, आज तुकाराम बीज आहे. मात्र देहूसाठी काहीच दिले नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र पंतप्रधानांनी भूमिपुजन केलेल्या स्मारकाचे पुढे काय झाले, त्यावर काहीच सांगितले नाही.
अजित पवार म्हणाले, या अर्थसंकल्पाला पंचामृत असे नाव दिले आहे. आम्ही सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात विकासाची पंचसूत्री मांडली होती. आता पंचामृत मांडून केवळ त्यांनी नाव बदलले आहे. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न झाला. आम्ही हे देणार, करणार असे म्हटले मात्र किती काय हे सांगितले नाही.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांना 6 हजार जाहीर केले आहेत. एका घरात 5 सदस्य आहेत. या रकमेला वाटले तर एकाच्या वाट्याला 3 रुपये येत आहेत. 3 रुपयात चहा तरी येतो का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ शब्दांचे इमले बांधलेत, असे पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, महिलांसाठी काही मध्यप्रदेशसारख्या घोषणा होतील असे वाटले होते. मात्र तसे काही झाले नाही. महाराष्ट्रावरील कर्ज साडेसहा लाख कोटीच्या पुढे गेले आहे. त्याबद्दल ते काही सांगायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही अर्थसंकल्प कसा सादर करणार यावर पुस्तक लिहिले होते. मात्र तो कसा वाचायचा हे त्यांना कळाले नाही.
आपल्या राज्याची परिस्थिती काय आहे. राज्याचं उत्पन्न किती, खर्च किती याचा कोणताही विचार सरकारने केलेला दिसत नाही. वीज, गॅस, पाणीपुरवठा, बांधकाम क्षेत्रासह अनेक क्षेत्रांमध्ये कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्प सादर करताना सरकारने लोकांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत फिरवण्याचं काम केलं आहे. निवडणुकीआधी केलेल्या घोषणांचं काय झालं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पात विकासकामांना कोणताही नवीन निधी देण्यात आलेला नाही. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे.